Tarun Bharat

अंगणवाडी सेविकांनी केली मोदींकडे ‘धन की बात’

‘मन की बात’मधून साधला संवाद, मानधन नको वेतन द्या अशी केली मागणी

प्रतिनिधी/ सातारा

शासनाची कोणतीही योजना असो, कोणतीही समस्या असो, कोरोना सारख्या महामारीतही तुटपुंज्या काम करणाऱया अंगणवाडी सेविका जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. अशा अंगणवाडी सेविका, मदतनिसांना मानधन नको तर वेतन द्या, अशी मागणी खुद्द अंगणवाडी सेविकांनीच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे अंगणवाडी सेविकांनी ‘धन की बात’ करुन आपल्या मागण्या पंतप्रधान मोदींकडे केल्या आहेत. त्यामुळे मोदी ही मागणी कधी पूर्ण करणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

  शासनाचे कोणतेही काम असो ते सुरुवातीला अंगणवाडी सेविकांनाच करावे लागते. कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन सर्व्हे केला. मुलांना पोषण आहार शिजवून देण्यापासून त्यांना शिक्षण देण्याचे काम, त्यांच्या लसीच्या वेळा चुकू नयेत याबाबतची दक्षता अंगणवाडी सेविका घेत असतात. हे काम करत असताना अंगणवाडी सेविकांना अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे मानधन नको तर पगार द्या, अशी मागणी सातारा शहरातील अंगणवाडी सेंविकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी सातारा शहर भाजपाच्यावतीने देवेज्ञ मंगल कार्यालयात अंगणवाडी सेविकांना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची सोय केली होते. हे नियोजन भाजपाचे शहराध्यक्ष विकास गोसावी, ऍड. नितीन शिंगटे, ऍड. प्रशांत खामकर, ऍड. सचिन तिरोडकर, प्रवीण शहाणे, राहुल शिवनामे, डॉ. उत्कर्ष रेपाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा शहरातील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. त्यावेळी अंगणवाडी सेविका सुनिता किर्वे, वृंदा नारकर यांनी आपली मते मांडताना अंगणवाडी सेविका ही अतिशय तुटपुंज्या मानधनात आपले काम करते आहे. आपल्या संसाराचा गाढा चालवणे मुश्किल बनले आहे. मानधन नको असून त्याऐवजी अंगणवाडी सेविकांना वेतन हवे आहे. वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली. पंतप्रधानांशी संवाद साधल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे दिसत होते.

Related Stories

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; आता आयकर विभागाच्या रडारवर

Archana Banage

गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षातून एकदाच घ्यावी लागणार परवानगी

datta jadhav

सातारा आणि कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात पाच दिवस अतिमुसळधार पाऊस

Abhijeet Khandekar

सातारा : आंतरजिल्हा बदलून आलेल्या शिक्षकांवर अन्याय का?

datta jadhav

नवनीत राणांना तुरुंगात अमानवीय वागणूक, लोकसभा अध्यक्षांनी मागवला अहवाल

Archana Banage

महाराष्ट्रात ‘ब्लॅक फंगस’ रुग्णांची संख्या 8,646 वर

Tousif Mujawar