Tarun Bharat

आपच्या उर्जामंत्र्यांनी कुडतरीतील महिला गट, शेतकऱयांची घेतली भेट

आपच्या 24/7 मोफत वीजेच्या हमीसाठी समर्थन प्राप्त केले

प्रतिनिधी /पणजी

दिल्लीचे उर्जामंत्री सत्येंद्र जैन हे गोव्यातील भाजपाचे ऊर्जामंत्री निलेश काब्राल यांच्याशी होणाऱया चर्चेसाठी अगोदरच गोव्यात दाखल झाले होते. आपच्या वीज हमीपासून जास्तीत जास्त फायदा घेऊ शकणाऱया गोयंकरांना भेटण्यासाठी गेले. जैन यांनी  निलेश काब्राल यांच्या कुडतरी मतदारसंघातील महिला गट व सालीगावमधील शेतकरी वर्गाची भेट घेतली.

 वीज शुल्काच्या वाढीमुळे आणि किंमती वाढल्यामुळे गोव्यातील महिलांवर थेट परिणाम होतो, तर पीक व्यवस्थापनास पाठिंबा देण्यासाठी शेतात होणाऱया नासाडीपासून झालेल्या अनेक मुद्यांबाबत सरकारकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे गोव्याचे शेतकरी त्रस्त आहेत. केवळ भाजपच्या भ्रष्टाचारामुळे गोवा अजूनही भूमिगत केबलिंग करीत नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.

  सभांना संबोधित करतांना सत्येंद्र जैन म्हणाले की, आपला गोंयकरांना त्यांचे हक्क प्रदान करण्याची इच्छा असल्याने भाजप आणि कांग्रेस घाबरले आहेत. यामुळे गोंयकरांच्या खिशातून भाजपा आणि कांग्रेसला होणाऱया नफ्याचा अंत होईल.

 जर मंत्र्यांना मोफत वीज मिळत असेल तर जे गोंयकर रात्रंदिवस आपल्या परिवाराचे पालनपोषण करण्यासाठी आणि आपल्या मुलांच्या स्वप्नांना पाठिंबा देण्याचे काम करतात त्यांना मोफत वीज का मिळू नये. “जर दिल्लीमध्ये आपण काही करू शकलो, तर गोव्यामध्ये हे का करता येत नाही? कांग्रेसचे आमदार खरेदी करण्यासाठी भाजपकडे पैसे आहेत पण गोंयकरांना त्यांचे हक्क देण्यासाठी पैसे नाहीत, असे जैन म्हणाले.

   भाजपने गोव्यातील कांग्रेसचे आमदार विकत घेतले असले तरी आपचा एकाही आमदार खरेदी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. कुडतरीमध्ये सत्ये?द्र जैन यांनी महिलांचे प्रश्न ऐकले. कुडतरीच्या स्त्रियांनी सांगितले की, किंमती वाढल्यामुळे आणि (साथीचा रोग) सर्व देशभर असल्याने आर्थिक मंदीमुळे त्यांची घरे व्यवस्थापित करणे त्यांना कठीण झाले आहे.या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना उच्च आणि वाढीव वीज बिले मिळत असताना, भाजपा सरकारकडून शून्य पाठिंबा मिळाला. त्यांनी 24/7, 300 युनिट मोफत विजेच्या आपच्या हमीची आवश्यकता प्रतिपादीत केली.

 सालीगावच्या शेतकऱयांनी असे सांगितले की,पीके निकामी झाल्यावर त्यांना सरकारने वाऱयावर सोडून दिले, त्यांचे संरक्षण देखील केले जात नाही किंवा त्यांना प्रोत्साहनही दिले नाही. साल नदीतील बदलांमुळे त्यांच्यातील बरेच जण त्यांच्या पीकासाठी झगडत राहिले.गोंयकरांच्या थाळीत जे लोक भोजन प्रदान करतात,असे असूनही त्यांना वाऱयावर सोडले गेले आणि दुर्लक्षित केली गेले,असे गोव्यातील शेतकऱयांनी सांगितले. त्यांनी आपच्या शेतकऱयांना मोफत वीज देण्याच्या हमीचे मनापासून समर्थन केले.

Related Stories

धुळेर येथील तार पॉलीक्लिनिकमध्ये चोरी

Amit Kulkarni

भाजपात प्रवेश केल्याने काणकोणचा विकास करता आला

Omkar B

बार्देशाला मुसळधार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

गोव्यातील सर्व मुस्लिम बांधवाना भाजपात आणणार

Omkar B

धडे – सावर्डे प्रभागात काळय़ा कारवरून गोंधळ

Amit Kulkarni

चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणातील संशयिताच्या मुसक्या आवळल्या

Amit Kulkarni