Tarun Bharat

आम्हीही शंख वाजवला, आता सरकारचा घंटा वाजणार : राकेश टिकैत

नवी दिल्ली /प्रतिनिधी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते आणि भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत सध्या उत्तर प्रदेशमध्ये आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारचा घंटा वाजणार असल्याचं विधान केलंय. तसेच हे वादळ आता पूर्वांचलकडे जाणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय. मागील १० महिन्यांपासून शेतकरी देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकायला तयार नाही, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच भाजप ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे. हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल.” असे ते बडनगरमध्ये बोलताना म्हणाले.

राकेश टिकैत यांना पत्रकारांनी बडनगरला पुन्हा कधी येणार असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, “जेव्हा केव्हा इकडं कार्यक्रम ठरेल तेव्हा पुन्हा येईल. हा राष्ट्रीय महामार्ग आहे. यावरुन जाण्याचा सर्वांना अधिकार आहे.”

बडनगरमधील घंट्याविषयी बोलताना टिकैत यांनी हा घंटा खराब झाला तर तो दुरुस्ती करण्याची जबाबदारी संघटनेची असेल. खराब झाल्यानंतर दुसरा घंटा लावत राहू. जोपर्यंत घंटा राहिल तोपर्यंत संघटना राहिल, टिकैत नाव राहिल. सरकार 10 महिन्यांपासून शेतकऱ्यांची मागणी ऐकत नाहीये. किमान घंट्याच्या निमित्ताने तरी ऐकेल अशी आशा आहे. ते हिंदुत्वाच्या नावावर निवडणुकीत तिकीट देणार आहेत. आम्ही घंटा वाजवला, शंखही वाजवला, आता या सरकारचा घंटा वाजणार आहे. हे वादळ आता इथून पूर्वांचलच्या दिशेने जाईल.

Related Stories

कुंभार, सुतार, विणकर, गायकही होणार ‘प्राध्यापक’

Amit Kulkarni

राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक ;शरद पवार कार्यालयात पोहोचले

Archana Banage

शिवाजी विद्यापीठ दीक्षांत समारंभ ; ग्रंथदिंडीला सुरुवात

Archana Banage

कलर टीव्हीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून बंदी

datta jadhav

काँगेस कार्यकर्ताच देशाला वाचवेल

Patil_p

देशात गेल्या २४ तासात ४० हजार १७ रुग्ण कोरोनामुक्त, तर ६१७ मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!