Tarun Bharat

उद्या कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवहार राहणार बंद

उद्योग, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे किसान संघर्ष समितीचे आवाहन

प्रतिनिधी / कोल्हापूर

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने दिनांक 26 मार्च रोजी अखिल भारतीय बंद पुकारण्यात आलेला आहे. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व लोकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी बिंदू चौकात सकाळी दहा वाजता शेतकरी विरोधी संसदेत मंजूर झालेले काळे कायदे मागे घ्या. यासाठी दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांनी या मांडलेला आहे. या आंदोलनाला चार महिने पूर्ण होत आहेत. तरी देखील सरकार या आंदोलनाच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका घेत नाही आहे. चर्चा वाटाघाटी मध्येच वेळ घालवत आहे. शांततेने चालू असलेल्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत चाललेला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळी 19 पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे व आपली एकजूट दाखवून दिलेली आहे.

अखिल भारतीय संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत तालुका- तालुका, गाव पातळीवर तसेच शहरात देखील कडकडीत बंद ठेवण्याचे करण्यात आले आहे. या बैठकीला कॉम्रेड नामदेव गावडे, रवी जाधव,टी.एस. पाटील,उदय नारकर, बाळासाहेब नाईक, बी. एल. बर्गे, रमेश वडणगेकर, बाबा मिठारी, वाय. एन. पाटील, बाळासाहेब पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या दारातच आढावा बैठक घेणार : आमदार आबिटकर

Archana Banage

कोल्हापूर : गोकुळमध्ये शेतकरी प्रतिनिधी का नको ?

Archana Banage

टेक्निकल टेक्स्टाईलसाठी योजना वस्त्रोद्योगाच्या भवितव्यासाठी स्वागतार्ह : हाळवणकर

Archana Banage

Kolhapur; मॉरीशसमध्ये होणार डॉ. शरद गायकवाड यांचा सन्मान

Abhijeet Khandekar

विद्युत मोटार चोरी प्रकरणी तीन मोटारी व साहित्यासह तिघे जेरबंद

Abhijeet Khandekar

Kolhapur : वाबळेवाडी शाळेला करवीरमधील शिक्षकांची भेट

Abhijeet Khandekar