Tarun Bharat

‘उमेद’ कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला ग्रामसंघातील महिलांचा पाठिंबा

प्रतिनिधी / कणकवली
राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुन:नियुक्ती थांबविण्याचे आदेश दिले. यामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहामध्ये काम करणाऱ्या महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. कणकवली तालुक्यातल्या नाटळ हिरकणी प्रभागसंघातील नरडवे नाटळ, कुंभवडे, दारिस्ते, दिगवळे येथील ग्रमसंघातील पदाधिकारी, सीआरपी ताई, कृषिसखी व महिलांनी आपापल्या गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली. तसेच स्वच्छता करून शासनाला हे अभियान चालविण्यासाठी प्रत्येकी १ रुपया मदतही गोळा केली. यावेळी आपले मत मांडताना या महिला म्हणाल्या की उमेद अभियानातील या सर्वच कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे, तेव्हा आता त्यांना शासन जर कमी करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. कारण या लोकांनी आम्हाला संघटित करून नवा विचार दिला आहे. त्यामुळे शासनाला जर या कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नसतील तर आम्ही देतो मात्र या अधिकाऱ्यांना काढून हे अभियान बंद करू नये अशी मागणी या महिलांनी केली आहे.

Related Stories

खुनाच्या आरोपातून संशयितांची निर्दोष मुक्तता

NIKHIL_N

माडखोल रस्त्यावर आढळले मगरीचे पिल्लू

Anuja Kudatarkar

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ‘तारीख पे तारीख’

NIKHIL_N

आचऱ्यात १५ वा वित्त आयोग गणस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेस उस्फुर्त प्रतिसाद

Anuja Kudatarkar

‘लॉकडाऊन मालूम, बिमारी कौनसी नही मालूम।

NIKHIL_N

उंबर्डे – वैभववाडी राज्य मार्गावर भीषण अपघात, सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू

Anuja Kudatarkar