Tarun Bharat

चांदा ते बांदा योजना राबवण्यास केसरकर जबाबदार

सेना-भाजप युतीचे नेत्यांची विकास महामंडळाच्या कामात भागीदारी

सावंतवाडी / प्रतिनिधी:

चांदा ते बांदा योजना तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या जिल्ह्यात राबवली खरी व ती योजना चांगली होती. पण प्रत्यक्षात ही योजना राबवण्यास पूर्णपणे केसरकर अपयशी ठरले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जे विकास कामे झाली ती अपूर्ण असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. अशी आता ओरड भाजप चे नेते करत आहेत. खरतर त्यावेळेस सेना-भाजप युतीची सत्ता होती, मग त्यावेळी हे भाजपचे नेते गप्प का होते. असा सवाल मनसेने चे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सावंतवाडी शहरात पर्यटन विकास महामंडळाच्या मधून जो घोटाळा झाला आहे. त्यामागे सेना-भाजपचे दोन्ही नेते पदाधिकारी जबाबदार आहेत. या संदर्भात आपण जन आंदोलन उभारून ही कामे व्यवस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. असे ते म्हणाले यावेळी मनसेचे पदाधिकारी आशिष सुभेदार उपस्थित होते.

Related Stories

गोव्यातून राजस्थानकडे नेण्यात येणारी १८ लाखांची दारू जप्त

Anuja Kudatarkar

मासेमारी बंद, आंदोलन सुरू

NIKHIL_N

माडखोल रस्त्यावर आढळले मगरीचे पिल्लू

Anuja Kudatarkar

हेदवीच्या बामणघळीत पडून दाम्पत्याचा मृत्यू

Patil_p

महात्मा फुले जनआरोग्य योजनेपासून कोरोना रुग्ण वंचित

Patil_p

लांजात शस्त्रधारी चोरटय़ांनी बंगला फोडला

Patil_p