Tarun Bharat

पालघर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला नोटीस

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. साधुंच्या हत्या प्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत ही चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेनंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. याची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. 


लॉक डाऊनच्या काळात दोन साधूंची जमावांनी हत्या केली होती. या प्रकरणी 115 जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे.  


दरम्यान, गुरुवारी या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. या दरम्यान, राज्य सरकार कडून या याचिकेला विरोध करण्यात आला.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात 1 मे रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यात न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना तपासाचा सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. 

Related Stories

आणखीन किती यश हवे?

Patil_p

कोरोनाविरोधी लसीकरण आता दृष्टीपथात

Patil_p

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू

datta jadhav

मुलांना मिळते आईचे आडनाव

Patil_p

चक्रीवादळ : एनडीआरएफची २४ पथके कर्नाटक, केरळ, गुजरात आणि महाराष्ट्रात तैनात

Archana Banage

मेडिकल स्टोअर्समध्ये लवकरच लस उपलब्ध

Patil_p