Tarun Bharat

फेब्रुवारीमध्ये 38 हजार नागरिकांचा विमान प्रवास

बेळगाव / प्रतिनिधी


बेळगावच्या सांबरा विमानतळावरून फेब्रुवारी महिन्यात 38 हजार 122 नागरिकांनी विमान प्रवास केला आहे. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा देण्यात येत असल्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या महिन्यात एकूण 716 विमानांच्या फेऱ्या झाल्या असल्याची माहिती विमान प्राधिकरणाच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.
बेळगाव विमानतळावरून मुंबई, बंगळूर, पुणे, हैद्राबाद, तिरुपती, कडप्पा, इंदूर, जयपूर, अहमदाबाद या शहरांना विमानसेवेने जोडण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव व परिसरातील नागरिकांचा विमानसेवेकडे ओढा आहे. इंडिगो, स्पाइस जेट, तृजेट, स्टार एअर व अलाइन्स एअर या कंपन्या सेवा देत आहेत. पुढील मोसमात अजून काही शहरांना विमानसेवा देण्यात येणार आहे.
मागील वर्षी याच महिन्यात केवळ 3 हजार 932 नागरीकांनी विमान प्रवास केला होता. त्यामुळे वर्षभरात विमानतळाने मोठी कामगिरी केली आहे. पुढील काही महिन्यांत 40 हजारांचा प्रवासी टप्पा गाठेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

सातारा : कोरोनाच्या सावटाखाली बेंदूर साधेपणाने साजरा

Archana Banage

खाद्यसुरक्षेत गुजरात, गोवा अव्वल

Patil_p

गोवा पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमक’ असा उल्लेख

Archana Banage

जिल्हा-खेडय़ांतूनच पूर्ण होईल नवभारताचे स्वप्न !

Patil_p

दक्षिण आफ्रिकेला 211 धावांची आघाडी

Patil_p

पवार-मोदींमध्ये ‘सहकार’

Patil_p