Tarun Bharat

बहिरेश्वर सरपंच निवड प्रक्रियेला स्थगिती

-उच्च न्यायालयाचे जिल्हा प्रशासनाला आदेश

प्रतिनिधी / कोल्हापूर

बहिरेश्वर तालुका करवीर ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. पुढील सुनावणी 29 रोजी होणार आहे. थेट जनतेतून निवडूण येवूनही सदस्यांच्या अविश्वास ठरावावर पद रद्द करुन नव्याने सरपंच निवड प्रक्रिया सुरु केली होती. यास सरपंच साऊबाई बचाटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

याबाबत अधिक माहिती अशी सत्ताबदलानतंर ग्रामविकास विभागाने थेट सरपंच निवडीचे नियम बदल केले. 16 सप्टेंबरला रोजी ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी काढलेल्या पत्रात ग्रामसभा रद्द करून ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांवर अविश्वास ठरावाबाबत निर्णय घेण्यास अधिकार दिले. या आधारे सरपंच साऊबाई बचाटे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला. 29 सप्टेंबरला तीन चतुर्थांशने तो मंजूर झाला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी उपसचिवांच्या पत्राच्या आधारे मंडल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 26 ऑक्टोबरला सरपंच निवड होणार होती. या विरोधात बजाटे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी पहिल्या सुनावणीतच निवडीला स्थगिती मिळाली. अशी माहिती अॅड. किरण पाटील, तेजस हिलगे यांनी दिले.

Related Stories

खंडपीठ कृती समितीची जानेवारीत मुख्य न्यायमूर्तींशी भेट

Abhijeet Khandekar

Kolhapur; वाढीव दरासह सर्व ऊसबिले देणारा भोगावती राज्यातील पहिला साखर कारखाना- पी.एन. पाटील

Abhijeet Khandekar

बड्यांचा नको, गरिब मराठ्यांचा विचार करा

Archana Banage

छ.राजाराम सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी दिलीपराव पाटील

Archana Banage

चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : ‘कोरोना’चे 6 बळी, 354 पॉझिटिव्ह

Archana Banage