Tarun Bharat

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई/प्रतिनिधी

काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा पासून अध्यक्ष निवड न झाल्याने विधानसभा अध्यक्षांची खुर्ची खालीच आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन ठाकरे सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी चॅलेंज केलं आहे. “विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

तसेच फडणवीस यांनी “हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर” अशी टीकाही फडणवीसांनी केली. दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस बोलत होते.

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का? हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

Related Stories

जिल्हाबंदीमुळे सिमेवर असणाऱ्या गावातील व्यवसाय,शेती अडचणीत

Archana Banage

अखिल भारतीय किसान सभा संघटनेचा भारत बंदला पाठिंबा

Patil_p

मेकेदातू प्रकल्प रखडण्याचा प्रश्नच नाहीः मुख्यमंत्री येडियुरप्पा

Archana Banage

…तर सरकारला स्वस्थ बसू देणार नाही : चंद्रकांत पाटील

Tousif Mujawar

आमदार पडळकरांनी मारले मैदान; अखेर गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यत संपन्न

Archana Banage

तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता ;सहकारी महिलेने केला होता लैंगिक अत्याचाराचा आरोप

Archana Banage