Tarun Bharat

भटक्या जनावरांप्रश्नी थेट न्यायालयात धाव

वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्ग शहरातील उपद्रवी ठरलेल्या भटक्या गुरांवर कोणतीही कारवाई न करण्यात आल्यामुळे नगरपंचायत विरुद्ध येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सावंतवाडा येथील पांडुरंग उर्फ अभिजीत खांबल यांनी काल 1 ऑक्टोंबर रोजी हा दावा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्ग शहर परिसरात उपद्रव करणाऱ्या भटक्या गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी श्री. खांबल यांनी 30 दिवसांच्या मुदतीची नोटीस वकिलांमार्फत दिली होती. परंतु अद्यापपर्यंत नगरपंचायतने या भटक्या गुरांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे नगरपंचायत विरुद्ध दिवाणी न्‍यायाधीश ( कनिष्‍ठ स्‍तर ) दोडामार्ग यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला असून नगरपंचायतला भटक्या गुरांचा त्वरित बंदोबस्त करण्याचे आदेश होण्याची मागणी या दाव्याद्वारे करण्यात आल्याचे श्री खांबल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

Related Stories

मेर्वी परिसरात हल्लेखोर बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Archana Banage

ओसरगावला पावणेदोन लाखाची दारू जप्त

NIKHIL_N

ऍपेक्स’ची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल मान्यता रद्द

Patil_p

हुंबरट येथे पाण्यात बुडून चिमुरडय़ाचा मृत्यू

NIKHIL_N

आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे नियोजन सावंतवाडीतून

NIKHIL_N

‘सिंधुरत्न समृध्द’ रत्नागिरी जिह्याच्या कानाकोपऱयात पोहोचवणार

Patil_p