प्रतिनिधी / भिलवडी
भिलवडी परिसरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. याकडे स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असून कोरोनाच्या महामारीत सत्ताधारी मात्र राजकारण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत.
यासाठी गाव अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. आशी मते व्यक्त होत आहेत. आज दिवसभरात भिलवडी २ . आमणापूर १५ . अंकलखोप येथे ७ रुग्ण पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. भिलवडी येथे प्रत्येक दिवसास दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. परंतु सरपंच विजय चोपडेयांचे याकडे सोईने दुर्लक्ष होत आहे


previous post