Tarun Bharat

मुंबईत मुसळधार : रस्ते वाहतूक; हार्बल – मध्य रेल्वे ठप्प

ऑनलाईन टीम / मुंबई : 


तळ कोकणाला झोडपून काढल्यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले असून याचा परिणाम रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्य तसेच हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून शहरामधील सखल भागात साचलेल्या पाण्याची पातळी लक्षात घेता बसेसच्या मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. या सोबतच पुढील 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा तर काही ठिकाणी अतितीव्र पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


दरम्यान, काल पासून सुरू झालेल्या पावसामुळे वडाळ्यामध्येही काही ठिकाणी पाणी साचले आहे. तर सकाळपासूनच रेल्वेच्या वाहतुकीची गती मंदावल्याचे चित्र पहायला मिळाले.

कुर्ला- विद्याविहारदरम्यान ट्रॅक्सवर पाणी साचल्याने वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने होत आहे. कुर्ला-विद्याविहारदरम्यानची स्लो मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय. हार्बर मार्गावरील वाहतूकही 20 ते 25 मिनिटे उशीराने होत आहे. मात्र मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हार्बर मार्गावरील वाहतूक उशीराने असली तरी सुरळीत सुरु असल्याचे सांगितले जात आहे. 

Related Stories

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा पूल आणि मोबाईल टॉवर उडवला

Archana Banage

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा

Archana Banage

“पाकिस्तान काश्मीरमध्ये भारतीयांच्या जीवाशी टी २० खेळतंय, पण तुम्ही… ”; ओवेसींचा मोदींवर निशाणा

Archana Banage

साहित्य, संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती

Tousif Mujawar

देशात कोरोनाची लस मिळणार मोफत

datta jadhav

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 268 वर

Tousif Mujawar