Tarun Bharat

राज्यातील अनलॉकचा गोंधळ आज दुपारपर्यंत दूर होण्याची शक्यता; विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण


नागपूर \ ऑनलाईन टीम

राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याची घोषणा काल , गुरूवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यानंतर काही वेळेतच असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले. यामुळे मात्र नागरिकांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. अनलॉकच्या नव्या गाईडलाईन संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मुख्यमंत्री त्यावर विचार करतील आणि दुपारपर्यंत अधिकसूचना निघेल, अशी प्रतिक्रिया आजमदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, अनलॉकच्या नव्या गाईडलाईन संदर्भात अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले. म्हणाले, विरोधक म्हणून त्यांची भूमिका योग्य असून त्यांना ती मांडावीच लागते. पण यामध्ये श्रेयवादाचा कोणताही विषय नाही. सरकार म्हणून जे काही करावं लागतं ते आम्ही करत असल्याचे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

विजय वडेट्टीवार यांच्या स्पष्टीकरनानंतर अनलॉक संदर्भात निर्माण झालेला गोंधळ आज दुपारपर्यंत दूर होईल, अशी आशा आहे.

Related Stories

पुणे विभागातील 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

कोल्हापूर : शिवसेनेचा कृषी विधेयका विरोधात बैलगाडी मोर्चा

Archana Banage

सातारा : कोरोना बांधितामुळे अंगापूर हादरले, एकाच दिवसात १६ पॉझिटिव्ह

Archana Banage

मिरजेत सामुहीक नमाज पठण, 41 जण ताब्यात, 15 जणांची धींड, व्हॅाटस्अ‍ॅपवर मॅसेज देऊन बोलाविले

Archana Banage

विनयभंगाच्या कलमाचं जयंत पाटलांकडून वाचन

Archana Banage

#DoctorsDay2021 : डॉक्टरांचे आभार व्यक्त करत पीएम मोदी म्हणाले, डॉक्टर्स देवाचे दुसरे रुप

Archana Banage