Tarun Bharat

राज्यात पुराचं संकट त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये ; मुख्यमंत्र्यांचं आवाहन


मुंबई \ ऑनलाईन टीम

कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये., असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू. राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.

पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे,असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Related Stories

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

सोमालियात हॉटेल हयातवर दहशतवाद्यांचा हल्ला; ११ जणांचा मृत्यू, मुंबईतील 26/11 ची पुर्नरावृत्ती

Abhijeet Khandekar

भारताच्या दीक्षा डागरला मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक

datta jadhav

विसावा नव्हे पंढरपूरपर्यंत 40 वारकऱ्यांच्यासह पायी जाण्याचा आग्रह : प्रशासनाशी चर्चा

Archana Banage

रविशंकर प्रसाद तामिळनाडूच्या राज्यपालपदी?

Patil_p

आणखी एका बोगस डॉक्टरला अटक

Patil_p