ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत, कोणत्याही परिस्थितीत त्या घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सामंत म्हणाले, शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी रविवारी नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा रद्द करत दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपेरही रद्द केला. त्यानंतर विद्यापीठांच्या इतर परीक्षाही रद्द झाल्या, अशाप्रकारचे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत. विद्यापीठांच्या राहिलेल्या परीक्षांसाठी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली असून, लवकरच ही समिती याबाबतचा अहवाल देईल, त्यानंतर परिक्षांचा निर्णय घेण्यात येईल, असेही सामंत म्हणाले.