अंगणवाडी फेडरेशनतर्फे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : अंगणवाडय़ांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता
प्रतिनिधी / बेळगाव
मुलांना शिक्षण देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱयांवर पूर्वीपासून आहे. अंगणवाडी सुरू करण्याचा उद्देशच तो होता. मात्र अलिकडे अंगणवाडी कर्मचारी म्हणजे केवळ काम करून घेण्याचे यंत्र असे केंद्र सरकार आणि राज्य सरकार समजत आहेत. वेगवेगळय़ा अधिक जबाबदाऱया टाकून वेठीस धरण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्या विरोधात अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स फेडरेशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
आरोग्य विभागाने सर्व्हे करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱयांना आदेश बजावण्यात आले आहेत. सीएनए सर्व्हे करावा, असे म्हटले आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती तसेच पाळीव जनावरे आणि प्राणी यांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचबरोबर आरोग्य संदर्भात जनजागृती करावी, असेही म्हटले आहे. मात्र हे काम करायला बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे अंगणवाडय़ांकडे दुर्लक्ष होणार आहे. तेंव्हा सर्व्हे करण्याचे काम इतर कर्मचाऱयांवर सोपविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली
आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड. नागेश सातेरी, उपाध्यक्ष वाय. बी. शिग्गीहळ्ळी, मिनाक्षी कोटगी, सुजाता बेळगावकर यांच्यासह कार्यकर्त्या उपस्थित होत्या.