डॉ. आदिती पंत… अंटार्क्टिकासारख्या अत्यंत दुर्गम आणि बर्फाळ प्रदेशात पाऊल ठेवणार्या पहिल्या भारतीय महिला शात्रज्ञ. 1983 मध्ये भारताच्या तिसर्या अंक्टार्टिका मोहिमेत त्या सहभागी झाल्या होत्या. डॉ. आदिती ओoशनोग्राफर आहेत. त्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे.
अंक्टार्टिका म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो. या खंडावर सगळीकडे बर्फाचं साम्राज्य. इथल्या वातावरणात तग धरणं सोपं नाही. विविध देशांमधले शात्रज्ञ अंटार्क्टिकावर जाऊन संशोधन करतात. इथल्या वातावरणाचा अभ्यास केला जातो. अंटार्क्टिकावर जाणं आजही सोपं नाही. डॉ. आदिती पंत 1983 मध्ये अंटार्क्टिकाला गेल्या. त्या भारताच्या तिसर्या अंटार्क्टिका मोहिमेच्या भाग होत्या. विशेष म्हणजे अंटार्क्टिकाला जाणार्या त्या पहिल्या भारतीय महिला शात्रज्ञ. या मोहिमेत त्यांच्यासोबत सुदिप्ता सेनगुप्ताही होत्या. विज्ञान क्षेत्रात महिला शात्रज्ञांची संख्या पुरूषांच्या तुलनेत कमी आहे. मात्र आदिती पंत यांनी ओशनोग्राफीसारखा विषय निवडला. त्यांना विज्ञानक्षेत्रात भरीव कामगिरी करायची होती.
आदिती यांचा जन्म नागपूरचा. बालवयातच त्यांना विज्ञानात रस निर्माण झाला. पालकांनी आदितीला निसर्गाशी हितगुज करू दिली. कालांतराने त्यांचा विज्ञानातला रस वाढत गेला. माग त्यांनी विज्ञान क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएससी केलं. ऍलिस्टर हार्डी लिखित द ओपन सी हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं. यामुळे ओशनोग्राफी या विषयात त्यांना रस निर्माण झाला. त्यांना समुद्रविज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हवाई विद्यदापीठाकडून शिष्यवृत्ती मिळाली. यानंतर त्यांनी लंडनमधील वेसफिल्ड विद्यापीठात पीएचडीसाठी प्रबेश घेतला. 1981 मध्ये अंटार्क्टिका करारावर स्वाक्षरी केल्यानंतर भारताने अंटार्क्टिकावर मोहिमा राबवायला संधी मिळाली. या मोहिमेदरम्यान अंटार्क्टिकावर भारताचं पहिलं संशोधन केंद्र असणार्या दक्षिण गंगोत्रीच्य उभारणीत या चमूने महत्त्वाची भूमिका बजावली. हे केंद्र दक्षिण धुवापासून 2500 किलोमीटवर आहे. 1984 मध्ये भारताच्या चौथ्या अंक्टार्टिका मोहिमेतही त्या सहभागी झाल्या होत्या. घरच्या गरीब परिस्थितीमुळे पंत यांना शिक्षण घेताना बर्याच अडचणी आल्या. पण या सगळ्यावर मात करत त्या पुढे आल्या.त्यांच्या नावावर पाच पेटंट आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 67 लेख छापून आले आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमांमध्ये मोलाचं योगदान दिल्याबद्दल आदिती यांना भारत सरकारतर्फे अंटार्क्टिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉ. आदिती यांच्या पावलावर पाऊल टाकत अनेकींनी अंटार्क्टिकाची वाट धरली.