ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नागरी उड्डाण मंत्रालय 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करत आहे. त्या बरोबरच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचीही तयारी केली जात आहे. अंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा कधी सुरू होणार, हे अजून स्पष्ट नाही.
उड्डाण मंत्रालयाचे अधिकारी या उड्डाणांसाठीची योजना तयार करत आहेत. आधी देशांतर्गत विमान उड्डाणांचे परिणाम बघितले जातील, म्हणजे आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा देताना काही येऊ नयेत.
नागरी उड्डायन मंत्री हरदीप पुरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू करण्याआधी खाजगी क्षेत्रातील विमान सेवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. त्यांची बाजू एकूण घेऊन
योजना तयार करावी म्हणजे तसा प्रस्ताव गृह मंत्रालयाला धोरण तयार करण्यास मदत होईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.