ऑनलाईन टीम / मुंबई :
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली. या घोषणेनुसार, अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या म्हणजेच बीए, बी.एस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले, मागील सत्रात उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल जाहीर करावा. याचा अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी तसं लेखी विद्यापीठाला द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही विद्यापीठाला लेखी द्यायचं आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी दिली जाईल, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, विधी, फार्मसी यासारख्या व्यावसायिक परीक्षा रद्द करण्याची मागणीही यावेळी केली गेली.