पाटगांव / वार्ताहर
अथणी शुगर भुदरगड युनिट यांच्याकडून कराची थकबाकी न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतुर्ली ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांनी कारखाना स्थळावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून असून यामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाली आहेत जोपर्यत कारखाना प्रशासनाचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रत्यक्ष भेटीला येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे.
तांबाळे ता. भुदरगड येथील अथनी शुगर्स युनिट नं ४ अंतुर्ली हा कारखाना अंतुर्ली ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात असुन सदर ग्रामपंचायतला नोंद आहे.हा कारखाना अथनी शुगर्स चालवत आहे.ज्यावेळी अथनी शुगर्सनं हा कारखाना चालवायला घेतला त्यावेळीपासूनचा ग्रामपंचायतचा संपूर्ण कर या कंपनीकडं थकीत आहे.करासंदर्भात ग्रामपंचायतनं वेळोवेळी नोटीसा देऊन देखील आजतागायत या कंपनीनं या विषयाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहेच पण गटविकास अधिकारी पंचायत समिती भुदरगड यांनी जिल्हाधिकारीच्या माध्यमातून दिलेल्या सुचनांची देखील अजीबात दखल घेतली नाही. त्यामूळे ग्रामस्थानी आंदोलनाचा इशारा दिला होता, ग्रामपंचायतनं ५ दिवसांच्या मुदतीची अंतिम नोटीस देऊन पण या कंपनीनं त्या नोटीसची दखल घेतली नाही.
शेवटी नाइलाजास्तव गावकर्यांनी मंगळवार दिनांक 21 रोजी अंतुर्ली ग्रामपंचायतीमार्फत सर्व ग्रामस्थांनी कारखाना स्थळावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान अथनी शुगर चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री योगेश पाटील यांनी फोन द्वारे ग्रामस्थांशी संपर्क साधला असता अथणी प्रशासनाकडे हा कारखाना सन २०१६नंतर आला आहे थकीत कराच्या मोबदल्यात आपण पाच लाख रुपये ग्रामपंचायतीला दिले आहेत, अन्य कारखान्याचा कर पाहता अंतुर्ली ग्रामपंचायतीचा कर हा जास्त असून आपण एवढा कर देऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर अंतुर्ली ग्रामस्थांनी आथनी शुगर चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री योगेश पाटील यांना प्रत्यक्ष कारखाना स्थळावर येऊन चर्चा करण्याची विनंती केली पण श्री पाटील यांनी आपण दोन दिवस भेटू शकत नसल्याचे सांगितले त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनस्थळी तहसीलदार अश्विनी वरुटे , पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलीस हवालदार सतीश पाटील विस्तार अधिकारी के.एस. पाटील, तलाठी सुषमा गोलार, एकनाथ मिसाळ संदीप वरंडेकर, सुशांत ताम्हणेकर , बाजीराव देसाई, संजय देसाई आप्पा वरंडेकर प्रकाश तवटे यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. आंदोलनाचे नेतृत्व सरपंच सौ प्रियांका जाधव, उपसरपंच आर के देसाई ,पोलीस पाटील बाबाजी देसाई, हरिदास देसाई ,रामदास देसाई, जितेंद्र देसाई प्रियंका पंदारे नारायण भूतल सुमन देसाई रेश्मा भूतल धनश्री कदम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले.