शहापूर स्मशानभूमीतील समस्या : महानगरपालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष, त्वरित दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी/बेळगाव
शहरात सदाशिवनगर आणि शहापूर वैकुंठधाम या महत्त्वाच्या स्मशानभूमीत बहुतांश प्रमाणात अंत्यविधी केल्या जातात. सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱयाच्या शेडचे पत्रे बदलण्यात आले होते. मात्र शहापूर स्मशानभूमीतील पत्रे बदलण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे अंत्यविधीवेळी पावसाळय़ात पाणी गळती होण्याची शक्मयता आहे.
शहर आणि उपनगरात सदाशिवनगर, शहापूर, अनगोळ, वडगाव आणि खासबाग अशा पाच स्मशानभूमी मुख्य आहेत. मात्र यापैकी सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीत अंत्यविधीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी चौथऱयांची संख्या देखील वाढविण्यात आली आहे. मात्र काही चौथऱयावरील शेडचे पत्रे खराब झाले असून, पावसाळय़ात पाणी गळतीची शक्मयता आहे. सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथरा शेडवरील पत्रे पूर्णपणे खराब झाले होते. त्यामुळे हे पत्रे बदलण्याची मागणी करण्यात आली होती. महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी स्मशानभूमीची पाहणी करून पत्रे बदलण्याची सूचना महापालिकेच्या अभियंत्यांना केली होती. त्यानुसार पत्रे बदलण्याची कारवाई आठ दिवसात करण्यात आली होती. त्याचवेळी शहापूर स्मशानभूमीतील पत्रे बदलण्यासाठी सूचना करण्यात आली होती.
त्यानुसार महापालिका आयुक्तांनी स्मशानभूमीची पाहणी केली होती. मात्र अंत्यविधी चौथरा शेडवरील पत्रे बदलण्यात आले नाहीत. मनपा अधिकाऱयांनी शहापूर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱयाच्या शेडवरील पत्रे तातडीने बदलण्याची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. स्मशानभूमीतील दिवे बंद असून, रात्रीच्यावेळी अंधार पसरलेला असतो. तसेच स्मशानभूमीच्या आवारात भटक्मया कुत्र्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंत्यविधीसाठी जाणाऱया नागरिकांच्या अंगावर भटकी कुत्री धावून येत आहेत. तसेच मृतदेहांची विटंबना करीत आहेत. त्यामुळे येथील पथदीप सुरू करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.