कोल्हापूर / प्रतिनिधी
प्लॅस्टिकचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन भाविकांकडून प्रसादासाठी होणारा प्लॅस्टिक बॅगेचा वापर टाळण्यासाठी कोल्हापूर डाक विभाग व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तांनासाठी 10 हजार कापडी प्रसाद थैली वाटप करण्यात आल्या.
श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात झालेल्या या कार्येक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट्मास्तर जनरल वीणा आर. श्रीनिवास यांच्या हस्ते व देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे तसेच कोल्हापूर टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमास अमोल कांबळे, संदिप कडगावकर, भरत पगार, राजेंद्र पाटील, अमोल शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून ० ते ५ वयोगटातील लहान मुलांचे आधार कार्ड पोस्टमनद्वारे मोबाईलवर काढण्याची सेवा टपाल खात्यामार्फत सुरु करण्यात आली असून तिची सुरुवातही यावेळी करण्यात आली.