प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटकात अंमली पदार्थांचे रॅकेट उघड होत आहे. यामुळे राजरोसपणे सुरू असलेल्या या धंद्यामुळे तरुण पिढी वाया जात असून त्यांना वेळीच सावरणे गरजेचे आहे. त्यामुळे अशांवर कडक कारवाई करून राज्य अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने पत्रांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यभरातील हजारो पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येत आहेत.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरण पुढे येत आहे. यामध्ये दररोज नवनवे खुलासे केले जात असून अनेक नावे पुढे येत आहेत. कर्नाटकातील अनेक कलाकार अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा संशय असून त्यांची चौकशी सुरू आहे. अंमली पदार्थ घेण्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे वेळीच थांबवावे, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हय़ातून एकूण 300 पत्रे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना पाठविण्यात आली आहेत.
यावेळी शहर सेपेटरी रोहित उमनाबादीमठ, कार्तिक शिगेहळ्ळी, शिवानंद कांबळे, शुभम वाळकी, ऋतिका हेगडी, सागर, गौरी पाटील, चिदानंद, रघु यादगिरी यासह अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.