सावंतवाडी/प्रतिनिधी-
दहावी निकालाची वेबसाईट क्रॅश झाल्याचे प्रकरण असतानाच आता अकरावी सीईटी प्रवेशासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाने सुरु केलेली वेबसाईटही क्रॅश झाली असून ती काही काळासाठी बंद करण्याची वेळ बोर्डावर आलीय. बोर्डाच्या या कारभाराने विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. ११ वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा २१ ऑगस्टला होत असून त्यासाठी१०० गुणांची प्रश्नपत्रिका आहे. तर २६ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.