ग्रामस्थांची आंदोलन छेडून मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अंकलगी व अक्कतंगेरहाळ येथील ग्राम पंचायतींना देण्यात आलेला नगरपंचायतीचा दर्जा रद्द करावा, या मागणीसाठी अंकलगी आणि अक्कतंगेरहाळ ग्रामस्थांनी मंगळवारी विधानसौधसमोर आंदोलन छेडले.
अक्कतंगेरहाळ गावची लोकसंख्या 16 हजार 374 इतकी आहे. मात्र, 20 हजार 822 इतकी लोकसंख्या असल्याचे भासवून नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. दरम्यान, वार्षिक उत्पन्नही कमी आहे. मात्र, शासनाला चुकीची माहिती पुरवून नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वी महसूल खात्याकडे यासंबंधीची माहिती पुरवून ग्रामस्थांनी नगरपंचायतीबाबत आक्षेप घेतला होता. गावाशेजारी असलेली रेस्टॉरंट व वाईन शॉपची नोंद गावामध्ये नाही. त्यामुळे ग्राम पंचायतचा महसूल कमी आहे. त्यामुळे अक्कतंगेरहाळ गावचा नगरपंचायतीचा दर्जा रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.