देवकीमातेचा शोक ऐकून रुक्मिणी तेथे धावत आली. कृष्ण विवरात नाहीसा झाला हे ऐकून ती आपल्या हातांनी डोके पिटून रडू लागली व जमिनीवर कोसळली.
म्हणे सौभाग्य झालें शून्य । कैसें चुडियां पडलें खाणे । हृदयमांदुसींचें रत्न । विवरिं पडोन हारपलें। माझिये मनःसंकल्पभुवनीं। आनंददुमाची लावणी। तेथ दुरदृष्टाच्या पवनीं । सत्राजिताग्नि पेटला।गडबडां लोळे धरणीवरी । धांवोनि रेवती तियेतें धरी । म्हणे वैदर्भिये शोक न करिं । अक्षत विवरिं तव भर्ता।तुजला अंबेचें वरदान । शोक न करें तें स्मरोन। त्रलोक्मयविजयी श्रीभगवान । तयालागूनि भय कैंचें।वसुदेव हाणोनि हंबरडा । लोळे धरणीवरी गडबडा । म्हणे सत्राजित हा कुडा । घातला दरवडा मजवरी ।उघडोनि माझी हृदयपेटी । नेला इंद्रनीळजगजेठी । विलाप करूनि ललाट पिटी। पडे भूपृ÷ाrं विसंज्ञ ।देवकप्रमुख उग्रसेन। वसुदेवा धरिती सांवरून । म्हणती अक्षत तव नंदन । पाहें विवरोन गगनोक्ति ।गरळा वमिती शतशः मुखें। पै त्या कालिय आकळू न शके ।
बाळपणीं त्या गळितां बकें । तैं तो मुके निजप्राणा।
तया कृष्णासी विवरिं मरण । ऐसें बोलणें अबद्ध जाण ।
कृष्णाआधीं आमुचे प्राण । जाती निर्याण त्या होतां ।
धैर्य देऊनि इत्यादि वचनीं । सावध वसुदेवा करूनी ।
म्हणती अक्षत चक्रपाणि । हा निश्चय मनीं असों दे ।
रुक्मिणी म्हणू लागली-हाय रे दैवा! माझे सौभाग्य आज शून्य झाले. माझ्या हातातील चुडा फुटला. माझ्या हृदयातील रत्न त्या विवरात पडून हरवले. माझ्या मनाच्या संकल्पभूमीत कृष्णस्नेहाच्या आनंद पिकाची लावणी केली होती. तेथे दूरवरून कुठूनतरी दृष्ट रुपी वारा वाहत आला. त्याचवेळी हा सत्राजिताग्नी पेटला आणि सारी वाताहत झाली. ती शोकाने जमिनीवर गडबडा लोळू लागली. तेव्हा बलरामाची पत्नी रेवती तिथे धावत आली. तिने रुक्मिणीला उठवले व म्हणाली – रुक्मिणी! तुझा पती विवरात अक्षत आहे. अक्षत म्हणजे ज्याची कधीही क्षती होत नाही. जो कधीही नष्ट होत नाही, असा तो भगवान आहे. रुक्मिणी! तुला तर अंबेचे वरदान आहे. तिचे स्मरण कर. भगवान श्रीकृष्ण त्रैलोक्मय जिंकणारा आहे. त्याला भय कसले? कृष्ण विवरातून परतला नाही ही वार्ता जेव्हा कृष्णपिता वसुदेवाने ऐकली तेव्हा त्यानेही हंबरडा फोडला-अरे हा सत्राजित दरोडेखोर आहे. याने माझ्यावर दरोडा घातला. असा आक्रोश करत तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. या दरोडेखोर सत्राजिताने माझी हृदयपेटी उघडून कृष्णरूपी इंद्रनीळरत्न चोरून नेले. असे म्हणून तो डोके बडवून आक्रोश करू लागला. त्यावेळी यादवांचा राजा उग्रसेन व इतर ज्ये÷ यादव तेथे धावत आले. वसुदेवाला सावरून धरत ते म्हणाले-वसुदेवा! कृष्णजन्माच्या वेळेची आकाशवाणी तुला आठवते ना? कृष्ण नष्ट होऊ शकत नाही. तो अक्षत आहे.
देवदत्त परुळेकर