प्रतिनिधी / सातारा
अक्षय तृतीयेला मोठे महत्व आहे. साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर काहीतरी नवीन घरी आणण्याची प्रथा आहे. तसेच नवीन कामाला ही सुरुवात केली जाते. मात्र, कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे अक्षय तृतीयेवर काळी कुट्ट गडद छाया असून सातारा शहरातील मोठमोठ्या सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर जरी वेगवेगळ्या ऑफर ठेवल्या असल्या तरी सातारकरांनी त्याला धुडकावून लावले. या वेळी सातारकरांनी हा सण काहीही न खरेदी करता साजरा केला. घरोघरी दुपारी 1 ते दुपारी दीड वाजण्याच्या मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.
कोरोनाच्या संकटाचा परिमाण सगळ्या जगावर झाला आहे. हिंदू सण उत्सवावर ही झाला आहे. लॉक डाऊनमुळे लोकांच्या हाताला काम नाही. रोजगार धंदे बंद आहेत.अजून पुढे काय होईल याची शक्यता नाही, अशी भीती सर्वसामान्यामधून व्यक्त होत आहे. अक्षय तृतीया हा साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. या मुहूर्तावर नवीन वस्तू , सोने नाने खरेदी करतात. नवीन कामाला सुरुवात करतात. मात्र, महामारीचे संकट असल्याने हा सण अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. सातारा शहरात काही मोठ्या दुकानांनी जरी ऑफर ठेवल्या असल्या तरी त्यास काहीच प्रतिसाद मिळाला नाही.दरम्यान, वाहने, कपडे यांची तर दुकाने बंद आहेत. त्यामुळे नवीन खरेदीचे सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे मुहूर्तावर दुपारी नागरिकांनी घरीच पूजन करून अक्षय तृतीया साजरी केली. कोरोनामुळे सोने व्यापाऱ्यांचे झाले नुकसान मार्केट आता तर बंदच आहे. व्यापाऱ्यांचे फार नुकसान झालं आहे. पाडवा आणि अक्षय तृतीया यासारखे दोन मोठे गुरू पुष्प कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारपेठेतली कोटीतली उलाढाल थांबली आहे. त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.