यंदा दिंडीची परंपरा खंडित,
बेळगाव :/ प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्रसह देशभरातून 15 लाखाहून अधिक भाविक एकवटतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली जाणारी आषाढीवारी दि. 1 जुलै राजी असली तरी या यात्रेसाठी विविध ठिकाणाहून निघणाऱया पायी दिंडी रद्द करण्यात आल्याने अखंडपणे चालत आलेल्या दिंडी सोहळय़ाला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच दिंडी सोहळा परंपरा यंदा खंडित होणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आषाढीवारी अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने विठुरायाच्या दर्शनाची वारकऱयांना आस लागून राहिली होती. शहरासह ग्रामीण भागाच्या विविध गावांतून लाखो भाविक विटूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना होतात. या आषाढी वारीसाठी विविध गावांतून दिंडय़ा निघतात. दिंडीच्या नियोजनासाठी होणारी लगबग थांबली आहे. दरवषी बेळगाव परिसरातून साधारण 20 ते 25 दिंडय़ा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. यापैकी काही दिंडय़ा गेल्या 50 ते 60 वर्षाहून अधिक काळ अखंडितपणे सुरू आहेत. मात्र यावषी दिंडय़ांना कोरोनाचा ब्रेक लागला आहे.
ग्रामीण भागातील अष्टे, सांबरा, निलजी, सुळगा, येळळूर, मासमर्डी, कंग्राळी खुर्द, पिरनवाडी, बसवाण कुडची, नावगे आदी गावांतून आषाढ वारीसाठी दींडय़ांचे आयोजन केले जाते. या दिंडय़ातून 200 ते 250 वारकरी टाळ, मृंदगासह स्वच्छेने सहभागी होत असतात. मात्र यावषी कोरोनाच्या संकटामुळे दिंडय़ांच निघणार नसल्याने दिंडी प्रमुखांसह वारकऱयांना दिंडीपासून दूर रहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने दिंडय़ा निघणार नसल्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे आषाढी आधी मार्गस्थ होणाऱया दिंडय़ांचे नियोजनाला पूर्णविराम मिळाला आहे. तालुक्मयातील पश्चिम भागातील दिंडय़ा भुतरामट्टी, गोटूर, चिकोडी, अंकली, निपाणी, कागवाड, म्हैशाळ, कमलापूर, सिताराम महाराज मठ खर्डी मार्गे तर पूर्व भागातील दिंडय़ा गोकाक, मुडलगी, हारूगेरी, अथणी, जत, सांगोलामार्गे पंढरपूरकडे रवाना होत होत्या. अलिकडच्या काही वर्षात दिंडय़ामध्ये सहभागी होणाऱयांची संख्या देखील वाढली आहे. आळंदी येथून श्री ज्ञानेश्वर माऊलीची तर देहू येथून तुकाराम महाराजांची पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. या मानाच्या पालखी सोहळय़ात बेळगाव परिसरातील शेकडो वारकरी सहभागी होतात. मात्र कोरोनामुळे संकटामुळे या पालख्यां रद्द झाल्याने वारकऱयांनी खंत व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया
गोंविद मोदगेकर, महाराज (दिंडी प्रमुख, निलजी)
आमची दींडी गेली 61 वर्षे अखंडीतपणे सुरू आहे. 1958 पासून सुरू झालेली दिंडी यावषी कोरोनामुळे खंडित होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी दिंडी होणार की नाही या संभ्रम होता मात्र अखेर शासनाने सध्याची परिस्थिती लक्षात घेत दिंडय़ांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे यावषी वारकऱयांना दिंडय़ांना मुकावे लागणार आहे.
हभप शिवाजी बसरीकट्टी
ऊन पावसाची कोणतीच तमा न बाळगता वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत होतो. अलिकडे लहान बालकांसह वयोवृध्दांचा सहभाग दिंडय़ांतून वाढला होता. दरवषी आळंदी व देहू निघणाऱया पालखी सोहळयामध्ये सहभागी होतो. मात्र यावषी कोरोनामुळे पालखी सोहळय़ात सहभागी होता येणार नाही. त्यामुळे खंत वाटत आहे. गेल्या 25 वर्षापासून दिंडय़ामधून सहभागी होत आले. मात्र यावषी ही परंपरा खंडित होणार आहे.
नेताजी जाधव
शहर व ग्रामीण भागातून मिळून 20 ते 25 दिंडय़ा दरवषी जातात या सर्वदिंडय़ाची परंपरा यावषी खंडित झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातून आषाढ वारीमध्ये सहभागी होणाऱयांची संख्या अधिक आहे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून दरवषी फलटणपासून पंढरपूरपर्यंत पायी दिंडीत सहभागी होत होतो. मात्र यावषी दिंडीपासून लांब रहावे लागणार आहे. मनात विटूरायाच्या दर्शनाची आस असली तरी कोरोनामुळे अडचणीत निर्माण होणार आहेत.