प्रतिनिधी / बेळगाव
क्यक्ती ऐवजी संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य अधिक प्रभावी ठरु शकते. अखिल कर्नाटक ब्राह्मण अर्चक व पुरोहित परिषदेच्या स्थापनेमुळे पुरोहितांना आपल्या हक्कासाठी आवाज उठविता येईल. मात्र परिषदेने लोक कल्याण हाच आपला मूळ हेतू आहे हे लक्षात ठेवून प्रयत्नशील रहावे, असा उपदेश प.पू. श्री सच्चिदानंद विद्यानृसिंह भारती महास्वामीजी यांनी केला.
अखिल कर्नाटक ब्राह्मण अर्चक व पुरोहित परिषदेतर्फे बेळगाव जिल्हा शाखा स्थापन करण्यात आली. तसेच नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. शाखेच्या स्थापनेचा सोहळा बुधवारी सकाळी टिळकवाडी येथील समर्थ मंदिरमध्ये पार पडला. त्यावेळी सच्चिदानंद महास्वामींनी हा उपदेश केला. व्यासपीठावर श्रीक्षेत्र केंगेरी, चिदंबरमठ, मुरगोडचे पीठाधिकारी प. पू.दिवाकर दिक्षित तसेच कर्नाटक राज्य ब्राम्हण विकास मंडळाचे अध्यक्ष एच. एस. सच्चिदानंदमूर्ती, राज्याध्यक्ष विश्वेश्वर भट्ट, सहकार्याध्यक्ष डॉ. बी. एस. राघवेंद्रभट्ट, कार्यवाह रमेश जोईस, बेळगाव जिल्हा ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष एस. एम. कुलकर्णी व राज्य कार्यकारिणी समस्य गुरुराज कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी दुर्गेश बोंदे व पुरोहितातर्फे विष्णू सहस्त्रनाम म्हणण्यात आले. प्रदीप जोशी यांनी शाखा स्थापनेमागचा हेतू कन्नडमध्ये तर प. पू. नागेशशास्त्राr हेर्लेकर यांनी मराठीमध्ये स्पष्ट केला. पूर्वी पुरोहितांना राजाश्रय होता. आता हीच भूमिका प्रशासनाने पार पडावी, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याच हस्ते सच्चिदानंद स्वामींचा सत्कार करण्यात आला.
वासुदेव छत्रे, वसंत जोशी, शाम ओगले, संजीवाचार्य वाळवेकर, गणेश फडके, संतोष बोंदे, विनायक वडेर, बाळ ग्रामोपाध्ये, हणमंत शास्त्रा, लक्ष्मीनारायण भट्ट, प्रसाद जोशी, सागर करुर यांच्या हस्ते विविध शहरातून आलेल्या पुरोहितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिवाकर दिक्षित यांनी संघटनेच्या माध्यमातूनच व्यक्तिगत आणि सामाजिक कल्याण होवू शकते, असे सांगितले.
राघवेंद्र व विश्वेश्वर भट्ट यांनी सध्याच्या वातावरणामध्ये पुरोहितांचे संघटन आवश्यक असून संघाचे कार्य कोणत्या पद्धतीने चालते याबद्दल माहिती दिली. एस. एम. कुलकर्णी यांनी बेळगावमध्ये सुरू असलेल्या गायत्री भवन इमारतीच्या निर्मितीबद्दल माहिती दिली. गुरुराज कुलकर्णी यांनी काळानुरुप बदल होत असून प्रत्येकवर्ग आपली संघटना बांधतो आहे. त्यामुळे पुरोहितांना सुद्धा संघटित होणे आवश्यक असल्याने शाखा सुरू झाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन संतोष जोशी यांनी केले. गिरीश जोशी यांनी आभार मानले. याचवेळी बेळगाव जिल्हय़ाची कार्यकारिणी निवडण्यात आले.