आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 35 कोटींचा निधी मंजूर : 15 वर्षांपासून अवजड वाहनांना बंदी :गेल्या पुरानंतर पुरानंतर सर्वच वाहतूक बंद : 2226 हेक्टर एकर जमिनीला होणार पाण्याची सोय
प्रतिनिधी / चिकोडी
कृष्णानदीचे पाणी अडविण्यासाठी असलेल्या चिकोडी तालुक्मयातील एकमेव कल्लोळ-येडूर दरम्यान कृष्णा नदीवरील बंधाऱयाचे महत्त्व अनन्यसाधरण आहे. 1981-82 साली 15 लाख रुपये खर्चून बांधलेला हा बंधारा कालबाह्य व जीर्ण झाला आहे. निर्मितीनंतर अवघ्या 30 वर्षांत हा बंधारा कालबाह्य झाला. तर गेल्या पंधरा वर्षांपासून या बंधाऱयावरील अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. गेल्या महापुरात बंधाऱयाचा काही भाग वाहून गेल्याने नवीन बंधरा निर्माण करणे आवश्यक बनले होते. सात वर्षांपासून धूळखात असलेल्या या बंधाऱयाच्या पुनर्निर्मितीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे. नदीकाठच्या नागरिकांतून यामुळे समाधन व्यक्त होत आहे.
कृष्णानदीच्या पाण्यावर विसंबून असलेल्या तसेच या बंधाऱयाचा वाहतुकीसाठी वापर करणाऱयांतून बंधाऱयाला मंजुरी मिळाल्याने व काम सुरू होणार असल्याने समाधन व्यक्त होत आहे. 1981-82 साली निर्माण केलेल्या या जुन्या बंधाऱयाची उंची 7.22 मीटर व लांबी 240 मीटर आहे. सततच्या महापुरामुळे याची सतत पडपड झाली आहे. गेल्या महापुरात तर बंधाऱयाचा कांही भाग वाहून गेल्याने हा बंधारा वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला होता. यामुळे नागरिकांना अंकली, मांजरी मार्गे फेऱयाने प्रवास करावा लागत होता. कालबाह्य ठरलेल्या या बंधाऱयावरून पंधरा वर्षांपासून बस इतर अवजड वाहने बंद केली असल्याने प्रवाशांना अंकली मांजरीमार्गे दूरचा प्रवास करावा लागत आहे. गेल्या महापुरापूर्वी किमान छोटी वाहने यावरून प्रवास करीत होती. पण बंधाऱयाचा भागच वाहून गेल्याने ही वाहतूकही पूर्ण बंद झाली.
या बंधाऱयाचा पाणी साठविण्याबरोबरच श्रीक्षेत्र येडूरला जाण्याचा जवळचा मार्ग उपलब्ध होता. कल्लोळ बंधाऱयात अडवलेल्या पाण्याचा वापर कल्लोळ, येडूर, चंदूर टेक, येडूरवाडी, चिकोडी, एकसंबा, नणदी, नणदीवाडी, यादनवाडी, जुगूळ, गंगावती, टाकळी, दानवाड, दत्तवाड या भागातील शेतकऱयांना होत होता. अंकली मांजरी दरम्यान पूल निर्मितीपूर्वी कृष्णा नदी पलीकडे प्रवास करण्यासाठी केवळ या एकमेव बंधाऱयाचा वापर केला जात होता.
येडूर मांजरी परिसरात वीट व्यवसाय असल्याने ही वाहतूक फेऱयाने वळविली जात असून यासाठी अधिक इंधन खर्च करावा लागत आहे. ऊस वाहतुकीसाठीही या बंधाऱयाची नितांत गरज आहे. हिप्परगी जलाशयात पाणी पूर्ण क्षमतेने अडविले जात असल्याने बॅकवॉटरवरच येथील शेतीला पाणी उपलब्ध होत होते. पण कल्लोळ बंधाऱयात पाणी अडविण्याचे कार्य अनेक वर्षापासून बंद झाले आहे. या बंधाऱयात पाणी अडविल्यास सीमावर्ती कर्नाटक व महाराष्ट्रातील पिण्याचे पाणी व पिकांची पाणी समस्या बहुतांशी निकाली लागू शकते.
या बंधाऱयाच्या निर्मितीसाठी 2013 पासून माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी सतत प्रयत्नशील आहेत. पाटबंधरे खात्याकडून आराखडा तयार करून त्याला मंजुरीही घेतली होती. पण कॅबिनेटच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याने या बंधऱ्याचे काम रखडले होते. बंधऱा मंजुरीचे श्रेयवाद लाटण्यासाठी विविध पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा शंकुस्थापणेचे काम केले आहे. पण प्रत्यक्षात बंधऱ्याच्या कामास अद्याप सुरूवात झाली नव्हती. आता कॅबिनेट बैठकीत 35 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून तातडीने निविदा काढून हे काम प्रत्यक्षात सुरू होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे.