रत्नागिरी / प्रतिनिधी
लॉकडाउन काळातील विज बिल माफी विजखांब कामाचे भाडे मिळण्यासाठी महावितरण अधीक्षक कार्यालयासमोर तब्बल तीन दिवस आमरण उपोषण करणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांना महावितरणने पंधरा दिवसात आश्वासनाची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने जितेंद्र चव्हाण यांनी आपले आमरण उपोषण गुरुवारी रात्री मागे घेतले जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी मध्यस्थाची भूमिका बजावत हे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती ही विनंती श्री चव्हाण यांनी मान्य करत आपले उपोषण मागे घेतले यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर उपस्थित होते.