तरूण भारत व सिटीझन्स फोरमच्या मागणीला यश
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 6 महिन्यांपासून बेळगाव – मुंबई रेल्वेसेवा बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. त्यामुळे हुबळी – एलटीटी (मुंबई) रेल्वे सुरू करण्याची तरूण भारतने केली होती. याचा सिटीझन्स कौन्सिल फोरमने पाठपुरावा केल्यामुळे 20 ऑक्टोबरपासून ही रेल्वे पुन्हा रूळावर येणार आहे. यामुळे आता बेळगाव ते मुंबई असा रेल्वेप्रवास करणे पुन्हा शक्य होणार आहे. तसेच दसरा – दिवाळीसाठी चाकरमानी गावी येवू शकणार आहेत.
रेल्वे विभागाने फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील 3 रेल्वे या बेळगावमधून धावणार आहेत. बेंगळूर – गांधीधाम (साप्ताहिक) म्हैसूर – अजमेर (द्विसाप्ताहिक) तर हुबळी – एलटीटी अशा 3 रेल्वे सुरू होणार आहेत.