सामाजिक कार्यकर्त्यांनी खंडाळा पोलिसांच्या मदतीने कारनामा उघडकीस
प्रतिनिधी/ सातारा
आज देशाला स्वातंत्र मिळून 70 वर्षाचा काळ लोटला आहे.ब्रिटिशानी दीडशे वर्ष गुलामगिरी केली.आज ही या देशात लोकशाही असूनही जनावरांसारखे काही ठिकाणी वागवले जाते.असाच प्रकार उघडकीस सामाजिक कार्यकर्त्यांनी खंडाळा पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे.चार मनोरुग्ण, बेघरांची त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे.आज ते चारही जण यशोधन निवारा केंद्रात सुखरूप आहेत.त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खंडाळा (सातारा) पुणे मुंबई हाईवे लगत तालुक्याचे ठिकाण. हाईवे ला ?हाँटेल व्यवसाय असल्याने अनेक ट्रक चालक अनाथ बेघर मनोरुग्णाना इथे सोडत असावेत असा अंदाज आहे.काही लोक अन्नाच्या आशेने तिथेच घुटमळतात तर काही मनोरुग्ण हाईवेने चालत राहतात हे एका व्यक्तीने हेरले. तो त्या मनोरुग्णाना गाडीत घालुन घरी घेऊन जात असे.त्यांना मारून दोन दोन दिवस जेवायाल देत नव्हता तर एका खोली मध्ये कोडुन ठेवायचा.मग त्या लोकाना भंगाराचे दुकान तर काही लोकाना गंवडी कामात मजुरी तर काहीना पावडर कंपनी मध्ये हमाली करायला लावत होता. रोज 400 रुपये हजेरीने तो पैसे उकळत होता.सध्याकाळी सुट्टी झाली कि परत घरी घेऊन येत होता. एका ताटलीमध्ये भात आणि शिजवलेली डाळ हेच जेवण द्यायचा.त्या मनोरुग्णाना ना अंथरायला ना अंगावरती घ्यायला कुठेतरी पुठ्ठावरती अंग टाकयचे.सकाळी तिच मरण यातना काम नाही केले तर काठीने मार भेटायचा.ही बाब युवराज ढमाळ यांच्या कानी पडली. त्यांनी ही बाब रवी बोडके यांना बोलून दाखवली. दोघानी ही या गोष्टीला वाचा फोडायची ठरवले.खंडाळा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिस निरिक्षक गायकवाड यांच्या कानावर ही बाब घातली.तो पर्यत्न त्या व्यक्तीला ही बाब समजली होती. त्याने युवराज ढमाळ यांना धमकी दिली.पुन्हा हे दोघे पोलिसात गेले.पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी त्या व्यक्तीला काही वेळातच सूचना देताच पोलीस ठाण्यात आणले.त्याची तंतरली होती खंर बोलायला तयारच नाही मग ज्याच्या कडे मजुर कामाला होते त्यांनाच बोलावले आणि 4 मनोरुग्णाना पण आणले. एक 70 वर्ष वयाचे वृद्धांनी साहब हाथ को आग से जलाता है बहुत पिटता है खाना भी नही देता बहुत तकलीभ होती है असे सांगताच त्याचे पितळ उघडे पडले.गायकवाड यांनी त्याच्या कडुन सर्व वदवुन घेतले आणि त्याच्या वर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली.यशोधनची गाडी आली होती मग सर्व त्या अनाथ बेघराना आपल्या यशोधन मध्ये आणले.खंडाळा पोलीस आणि यशोधन चॅरिटेबल ट्रस्टचे रवी बोडके, युवराज ढमाळ यांचे कौतुक होत आहे.