यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारांतून सामान्यांच्या जीवनासाठी-आरोग्यासाठी व्हावा, यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसविण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. निसर्गाने जे-जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्निद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यू या प्रवासात त्या समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणूनच छोटे यज्ञ किंवा याग केले जातात.
छोटय़ा यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो. तर मोठय़ा यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱयाच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्निप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, साळीच्या लाहय़ा, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार या वृक्षांच्याखाली पडलेल्या कांडय़ा, दुर्वा, हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. आताच्या आधुनिक वैज्ञानिकदृष्टीने जगणाऱया जगात यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञविधी आहे? याचा आम्ही शोध घेतला असता ‘अग्निहोत्र’ या यज्ञविधीने आमचे लक्ष वेधले. सर्व यज्ञात मनशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश ‘अग्निहोत्र’ने सुद्धा लाभू शकतात. हे ही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिकदृष्टीने त्याची उपयुक्तता सिद्ध करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोटय़ांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो.
‘अग्निहोत्र’ हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे. जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटांत करता येतो. या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3 ते 5 इतका खर्च येतो. अग्निहोत्रासाठी सूर्योदय व सूर्यास्त या दोन्ही वेळा उपयुक्त आहेत. शक्मयतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.
अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात
1) तांब्याचे पिरॅमिड पद्धतीने हवन पात्र, 2) गायीच्या दुधाचे शुद्ध तूप 2-3 चमचे, 3) गायीच्या शेणाच्या गोवऱया 4-5 तुकडे, 4) हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे 4-5 ग्रॅम. सूर्योदयावेळी या तांब्याच्या पात्रात गायीच्या गोवऱयांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गायीच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. ‘सूर्याय स्वाहाः’, ‘सूर्याय इदम्न मम’, ‘प्रजापतये स्वाहाः’, प्रजापतये इदम् न मम, सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. ‘अग्नये स्वाहाः, अग्नये इदम्न मम्, प्रजापतये स्वाहाः, ‘प्रजापतये इदम्न मम’, हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्निसमोर बसणे. अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला. जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ, अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले.
अग्निहोत्र प्रयोगाची खालील उद्दिष्टय़े ठरविण्यात आली-
1) अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल. 2) अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सुक्ष्मजंतूंवर परिणाम, 3) अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम, 4) अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या बी-बियाणे वाढीवर होणारा परिणाम, 5) अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म, 6) अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण, हे प्रयोगशाळेतील वर्गात करण्यात आले. ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली. माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरिता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली. त्यासाठी प्रज्ञा विकास मंचच्या ‘फ्रॉस्ट’ या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक साहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्ष्य मीटरच्या साहाय्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सुक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली. त्यामुळे जवळजवळ 90 टक्के सुक्ष्मजंतूंची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण दहापटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले. रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरणात राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ जोमाने व मोठय़ा प्रमाणात होते, हे आढळून आले. यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे. हे ही सिद्ध झाले. अग्निहोत्राची राख जंतूनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते, हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण 80 ते 90 टक्क्मयांपेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो, हे सिद्ध झाले. अवघ्या 3 ते 5 रुपये खर्चात रोज फक्त 10 मिनिटे सकाळी व संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतूविरहीत करू शकतो. शेतीकरिता त्या राखेचाही उपयोग करू शकतो. हे आम्ही जगासमोर सप्रमाण निष्कर्ष काढून व जगात आपल्या पूर्वपारंपरिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या 15 वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी ‘मिनरल वॉटर’ इतके शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच. पण त्याकरिता सर्वांनीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी न बाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
या अभ्यासादरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, झेकोस्लोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्वित्झर्लंड, स्पेन, कॅनडा इत्यादी 70 देशांनी अग्निहोत्र या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी यावरील शेतीला प्दस aिrस्ग्हु tाम्प्हग्लि असे नावही दिले आहे. दुर्देवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातुशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विहीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंट्स नोंदवली, हे दुर्देव होय. नुकतेच याच महिन्यात इंग्लंडस्थित ‘पॅनगयिया’ या कंपनीने आपल्या पारंपरिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळविण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला. आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोऱया लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण ‘कथिलाचा वाळा’ हाती बाळगून आहोत, असे खेदाने म्हणावे लागते.
– डॉ. प्रमोद प्र. मोघे (निवृत्त ज्येष्ट शास्त्रज्ञ)