ऑनलाइन टीम / पुणे :
सुलेखनकार अच्युत पालव आपल्या सुलेखनकलेचा चार दशकाहून अधिक असलेला प्रवास आणि प्रदर्शनाच्या रूपाने आपल्यासमोर घेऊन येत आहेत. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा येथे या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. सादर प्रदर्शन 21 ते 27 जानेवारी या कालावधीत सकाळी 11 ते 7 या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
1973 साली परेलच्या डॉ. शिरोडकर हायस्कुलमध्ये शाळेच्या परंपरेनुसार फळ्यावर सुविचार लिहायला सुरुवात केली आणि आजपर्यंत त्या अक्षरांनी पालवांची किंवा पाठवणी अक्षरांची पाठ सोडली नाही. फळा, बॅनर, होर्डिंग, नेमप्लेट पासून ते पेपर, कॅनव्हास, इंटेरिअरमधील भिंती अशा अनेक माध्यमांबरोबर मोडी लिपीचा अभ्यास करताना मिळालेली कागदपत्र काही नाणी आणि सुलेखनासाठी vaparleli साधनं असं बराच काही या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अक्षरयान 2020 हि संकल्पना अक्षरद्वारे मांडण्यात येणार आहे.