नाशिक/प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे राणेंना अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मिळाला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. राणेंची सध्या कोकणात जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. तर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. त्यांनी अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, असा राणेंना अप्रत्यक्ष इशारा दिला. राऊत यांनी बोलताना, आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे विधान केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असं राऊत म्हणाले.