ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. लॉक डाऊन मध्ये सर्व सेवा बंद आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूकीचा देखील समावेश आहे. पण गेल्या दीड महिन्यांपासून बंद असलेली सार्वजनिक वाहतूक भविष्यात केंद्र सरकारच्या अटी आणि शर्थींसह लवकरच सुरू करण्याची शक्यता आहे, असे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
नितीन गडकरी यांनी बस आणि कार वाहतूक संघटनेला संबोधित केले.
त्यावेळी ते म्हणाले, सार्वजनिक वाहतूक लवकर सुरू होऊ शकते. त्यासाठी नियमावली तयार केली जात आहे.
पुढे ते म्हणाले, वाहतूक आणि महामार्ग खुले करणे हा सर्व सामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे माध्यम ठरू शकते. मात्र, बस आणि कार वाहतूक सुरू झाल्यावर स्वच्छता, मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन अनिवार्य असेल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी यावेळी आपण सर्वजण एकत्र येऊन ही लढाई लढल्यास नक्कीच यशस्वी होऊ असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.