निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले जहाज भाटीमिऱया किनाऱयावर
प्रतिनिधी/ रत्नागिरी
निसर्ग वादळाच्या तडाख्यात सापडलेले भगवती बंदर येथील एम. टी. बंसरा स्टार हे बार्ज भरकटत मिऱया किनाऱयावर अडकून पडले आहे. समुद्र खवळलेला असल्यामुळे बार्ज सुरक्षितपणे नेणे अशक्य होते. मात्र सोमवारी हे जहाज समुद्रात पोर्णिमेमुळे आलेल्या भरतीमुळे बऱयापैकी पाण्यावर तरंगत असल्याचे दिसत होते. त्यामुळे हे जहाज भाटीमिऱया येथून हलवणे शक्य झाले असते. मात्र या जहाजावरील 13 कर्मचाऱयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वबचे नमुनेही अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जहाज काढण्यासाठी यंत्रणा दाखल झालेली असतानाही हे जहाज भाटीमिऱया येथून हलवण्याची संधी हुकणार, असे चित्र दिसत आहे.
पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर समुद्रात चांगलीच भरती आली आहे. या भरतीमुळे पूर्वी वाळूत अडकलेले हे जहाज बऱयापैकी पाण्यावर तरंगत आहे. ही परिस्थिती आणखी 2 ते 3 दिवस राहिल. त्यानंतर समुद्राला अहोटी लागेल व हे जहाज पुन्हा वाळूत अडकून पडेल ते पुढील अमावस्येला समुदाला भरती येईल तोपर्यंत तसेच राहिल. गेले काही दिवस हे जहाज किनाऱयावर अडकून होते. लाटांच्या माऱयामुळे हे जहाज धूपप्रतिबंधक बधाऱयांच्या दगडावर आपटत होते. त्यामुळे आणखी काही दिवस हे जहाज किनाऱयावर राहिल्यास लाटांच्या तडाख्याने त्याचे नुकसान होऊ शकते. या जहाजावरील तेल समुद्रात मिसळून पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकतो.
या बाबत अधिकृत सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, अडकलेले जहाज बाहेर काढण्यासाठी यंत्रणा दाखल झाली आहे. या जहाजाबाबत प्रशासकीय यंत्रणा नियमित लक्ष ठेऊनही आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जहाजावरील सर्व कर्मचाऱयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या स्वॅबचे नमुन घेउढन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र अद्यापही या कर्मचाऱयांच्या स्वॅबचा रिपोर्टची प्रशासनाला प्रतीक्षा आहे. या कर्मचाऱयांच्या स्वॅबचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर किमान 5 कर्मचारी तरी हे जहाज भाटीमिऱया येथून हलवण्यासाठी लागणार आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या परवांनगीनंतर हे जहाज बाहेर काढण्यात येईल. मात्र स्वॅबचा रिपोर्ट प्रतीक्षेत असल्यामुळे या कर्मचाऱयांशिवाय जहाज बाहेर काढणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संधी असूनही जहाज काढण्यात प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत ठरणार आहे.
.