ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारकडून ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे त्यांना करातून सुट मिळाली आहे. त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. अडीच ते 5 लाखांपर्यत उत्पन्न आहे, त्यांना 5 टक्के कर भरावा लागणार आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली.
पाच लाख ते साडेसात लाख उत्पन्न असणाऱयांना 20 टक्के ऐवजी 10 टक्के कर भरावा लागणार आहे. साडेसात लाख ते दहा लाख असं उत्पन्न असणाऱयांना 20 ऐवजी 15 टक्के कर भरावा लागणार आहे. दहा ते साडेबारा लाख असं उत्पन्न असणाऱयांना 20 टक्के कर भरावा लागणार आहे.
साडेबारा ते पंधरा लाख असं उत्पन्न असणाऱयांना 25 टक्के कर भरावा लागणार आहे. तर 15 लाखांच्या वर उत्पन्न असणाऱयांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.