ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाविकास आघाडी सरकार मार्चमध्ये कोसळणार असल्याच्या नारायण राणेंच्या भाकिताला आता रामदास आठवलेंनी दुजोरा दिला आहे. येत्या मार्च किंवा एप्रिलपर्यंत राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता पडणार आहे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी वर्तवले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विधानावर प्रश्न विचारले असता कदाचित अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा भाजपसोबत येईल. राणेंनी त्यांची भूमिका मांडली. त्यांना तसे वाटत असेल. मला वाटते की महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही. मार्च असो वा एप्रिल महाविकास आघाडी लवकरच जाईल अशी अपेक्षा आहे.” असे ते म्हणाले.
सांगली दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री आठवले यांनी शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत येऊन सरकार स्थापित करण्याची ऑफर दिली आहे. शिवसेनेने आपला निर्णय पाहिजे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे असेल तर शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. त्यासाठी भाजप, शिवसेना आणि आरपीआय या तिघांनी एकत्रित यावे. यासोबतच, भाजप आणि शिवसेना यांची युती असताना अडीच-अडीच वर्षांचा फॉर्मुला होता अशी आठवणही यावेळी आठवलेंनी करून दिली.
ताहवलेंनी शिवसेनेने अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यावर पुन्हा एकदा विचार करायाला हवा. शिवसेनेने अडीच वर्षे झाल्यानंतर मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांना द्यावे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेने यावर एकमत व्हायला हवे. अजुनही वेळ गेलेली नाही. भाजप आणि शिवसेनेची सत्ता स्थापित केली जाऊ शकते असा विश्वास रामदार आठवलेंनी व्यक्त केला आहे.
ऑनलाईन टीम/तरुण भारत