फेरीवाले, रिक्षावाले, घरकाम महिला प्रतिक्षेत
प्रतिनिधी/ सातारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन काळात दीड हजार रुपये फेरीवाले, रिक्षावाले, घरकाम करणाऱया महिलांना देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापही दमडी मिळाली नाही. ते पैसे कधी मिळतील याच्या प्रतिक्षेत असून सातारा पालिकेमध्ये वेगळेच निकष लावले गेले आहेत. ज्यांनी दहा हजार रुपयांचे कर्ज घेतलेले असेल आणि ते फेडले असेल तरच त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊन काळात ज्यांची हातावर पोट आहेत. अशांना मदत कशी करता येईल म्हणून शासनाकडून दीड हजार रुपये देण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली होती. ते दीड हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून फेरीवाले, रिक्षावाले, बांधकाम कामगार यांच्यासाठी पाठवले गेले आहेत. परंतु नगरपालिकेतूनच ज्यांनी यापूर्वी गतवर्षी ज्यांनी दहा हजार रुपयांचे घेतलेले कर्ज फेडलेले आहेत. त्यांच्याच खात्यात दीड हजार रुपये वर्ग केले असे 25 ते 30 जण सातारा शहरात आहेत. तर खासदार उदयनराजेंनी केलेली 1 हजार रुपयांची घोषणा अद्याप तशीच आहे. मदत कधी मिळणार याच्याच प्रतिक्षेत लाभार्थी आहेत.
शासनाने 1500 रुपये जाहीर केले होते. तो अजून कुठलाच निधी दिलेला नाही. शासन काय गोरगरीबांचा अंत बघताय का?, शासनाने तातडीने पैसे पाठवायला पाहिजे. गोरगरीबांना लाभ मिळालयला पाहिजे. नगरपालिकेने जे हजार रुपये डिक्लेर केले होते. त्याला कुठली मान्यता नाही. कुणाला माहिती नाही. ते तर हजार रुपये बाजूलाच राहिले. पंधराशे रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न कुठे आहेत. सातारा शहरात विलिनीकरण सेंटर उभी करायलाही कुठे तयार नाहीत. एवढी नगरपालिका मंगल कार्यालय आहे. नगरपालिकेची यंत्रणा आहे. 14 व्या वित्त आयोगातून पैसे खर्च करता येतात. परंतु तसे काही दिसत नाही. अ वर्ग नगरपालिका आहे. एवढा फंड येतो. नेत्यांनी लक्ष घालून केले पाहिजे.