राजापूर
राजापूर आणि कोल्हापूरला जोडणाऱया अणुस्कुरा घाटात मंगळवारी सकाळी दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र बांधकाम विभागाने चार तासात दरड हटवून वाहतूक सुरू केली.
मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास अणुस्कुरा घाटात भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. एस. दुधाडे, शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी कामगार व यंत्र सामुग्रीसह अणुस्कुरा येथे पोचत दगड व माती बाजूला करून चार तासात वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. दुपारपर्यंत अणुस्कुरा घाटातील सर्व वाहतूक सुरळीत झाली होती.
…