ऑनलाईन टीम / नवी मुंबई
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत निर्बंध घातले आहेत. यामूळे राज्यात दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर बंदी आहे. असा राज्य शासनाने नियम केला असला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे नियम डावलत विरोध दर्शवला. तसेच अनेक ठीकाणी दहीहंडी उत्सव साजरा केला. याच्या समर्थनार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. याच परिषदे दरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली राज्यातील मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यात भाजप चांगला आक्रमक झाला असताना अण्णा हजारे यांनी देखील राज्य सरकारला मंदिरे उघडण्याचा इशारा दिला होता. यावरच भाष्य करत राज ठाकरे यांनी “अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?” असा सवाल राज यांनी केला आहे. त्याचसोबत राज ठाकरे यांनी या प्रकरणी शिवसेनेपासून भाजपपर्यंत सर्वांवरच टीका केली आहे.
तसेच केवळ सामान्यांना सणउत्सव साजरे केल्याने कोरोना संसर्ग होतो. मात्र भाजपची जन आशीर्वाद यात्रा झाली. नेत्यांच्यासाठी मंदिरे सूरु आहेत. मेळावे, सभा चालतात पण आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आला की लॉकडाऊन, असे म्हणत राज यांनी चांगलीच टोलेबाजी केली.