वृत्तसंस्था / मुंबई :
वित्तीय तुटीची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त नोटांची छपाई करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नकार दर्शवला आहे. नोटा छपाईबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करत आरबीआयने केंद्र सरकारला धक्का दिला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी वित्तीय तुटीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच सद्यस्थितीत रेपो दरातही कोणताही बदल न करण्याचा निर्णय आरबीआयने जाहीर केला आहे.
आर्थिक तूट भरून काढण्यासाठी नव्या नोटा छापल्या जाणार नाहीत असे शक्तिकांत दास यांनी गुरुवारी झालेल्या द्वैमासिक बैठकीनंतर स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 3.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. मात्र, वाढती वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी जास्त पैसे छापण्याची कोणतीही योजना नाही, असेही ते म्हणाले. वित्तीय तूट पुढील आर्थिक वर्ष 2020-21 साठी 3.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये ती 3 टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. डिसेंबरअखेरीस सरकारची वित्तीय तूट 132 टक्क्मयांच्या पुढे गेली आहे.
दर जैसे थे
रेपो दर 5.15 च्या पातळीवर ठेवण्याचा निर्णय घेतला. अनिश्चित जागतिक वातावरण व देशांतर्गत बाजारात वाढती महागाई आणि अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे वित्तीय तूट अंदाज वाढण्याची शक्यता असल्याने आरबीआयने दर सध्या जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.