संबंधितांचे दुर्लक्ष : वाहतुकीस धोका, दुरुस्तीची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अगसगे-अतिवाड या तीन किलो मिटरच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतुकीस धोकायदायक ठरत आहे. गतवषी पावसाळय़ात खचलेल्या रस्त्याच्या दुरूस्तीकडे अद्याप दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. संबंधितांनी तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील वाहनधारकांनी दिला आहे.
दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र एका वर्षात रस्त्याशेजारी असलेला भराव खचल्याने रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तातडीने ठेकेदाराने लक्ष पुरवून रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील वाहनधारक व शेतकऱयांतून होत आहे. ठिकठिकाणी रस्ता खचल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
या रस्त्यावरून बेकिनकेरे, अतिवाड, चलवेनहट्टीसह चंदगड तालुक्मयातील कौलगे, बुक्कीहाळ, कागणी, किटवाड, होसूर आदी परिसरातील जनतेला सोयीस्कर आहे. शिवाय रस्ता शिवारातून गेल्याने शेतकऱयांची वर्दळ अधिक आहे. शेतातील उत्पादीत बटाटा, रताळी, भाजीपाला एपीएमसी मार्केटला नेण्यासाठी हा रस्ता कमी अंतराचा आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक वाढली आहे.
गेल्या पावसाळय़ात या मार्गावरील भरावा वाहून गेल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली आहे. त्यामुळे रात्री मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.