आरोपींना अटक करावी यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
अतिवाड येथील रिया दीपक बेळगावकर या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या वडिलांनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली होती. असे असताना अजूनही या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला नाही. त्यामुळे अतिवाड ग्रामस्थांनी आणि जायंटस् ग्रुप बेळगावतर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
अतिवाड येथील या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपीचा छडा लावून तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला आहे. रिया बेळगावकर हिचा 6 सप्टेंबर रोजी संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली. तिच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली. तीने आत्महत्या केल्याचे भासविण्यात आले. मात्र ती आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने तपास लावून या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, मारुती बेळगावकर, दीपक बेळगावकर, जायंटस् ग्रुपचे मोहन कारेकर, संजय पाटील, मधू बेळगावकर, यल्लाप्पा पाटील, शिवानंद हिरेमठ, राहुल बेळवटकर, लक्ष्मण शिंदे, यल्लाप्पा पाटील, उमेश कदम-पाटील, विजय अक्षीमनी, राजू बांदिवडेकर, अजित कोकणे, राजू जैन, एल. डी. चौगुले, कल्लाप्पा कडोलकर, वसंत पाटील, नारायण मास्तोळे, वसंत कणबरकर, कामाण्णा डोंगरे, मारुती हेब्बाळकर, लक्ष्मण हेब्बाळकर, तुकाराम पाटील, भरमा पाटील, बाबु कांबळे यांच्यासह अतिवाड, बेकिणकेरे, उचगाव ग्रामस्थ उपस्थित होते.