प्रतिनिधी/ महाबळेश्वर
महाबळेश्वर तालुका हा अति पावसाळी व दुर्गम तालुका असून अतिवृष्टीमुळे अगर नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी समन्वयाने तात्काळ सादर करणेची दक्षता घ्यावी असे असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी पंचायत समिती महाबळेश्वर च्या आढावा सभेचे वेळी दिले.
कोरोना 19 चा संपुर्ण तालुक्याचा आढावा, निसर्ग वादळ नुकसानीचा आढावा व सर्व शासकीय विभागाकडील विविध योजनांची आढावा बैठक स्व एम आर भिलारे सभागृहात आयोजित करणेत आलेली होती या सभेस उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सा प्र) मनोज जाधव,तहसीलदार सुषमा पाटील,मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील तसेच तालुक्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबदादा भिलारे,सभापती अंजना कदम,उपसभापती संजुबाबा गायकवाड, सदस्य आनंदा उतेकर,गट विकास अधिकारी नारायण घोलप व तालुक्यातील सर्व खाते प्रमुख उपस्तिथ होते,
जिल्हा परिषदेच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोविड 19 अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ कदम व डॉ शहा यांनी दिला यावेळी ग्रामस्तरीय समितीचे कामकाजाचे कौतुक करून आशा सेविकेंच्या कामाचा आढावा घेणेत येऊन त्यांना पुरविलेल्या कोविड 19 कोम ओरबीड नोंदवही नियमीत तपासणी करून अद्यावत ठेवण्याच्या सूचना दिल्या
तसेच थर्मोमीटर ने तपासणी करताना आल्या आल्या लगेच न करता 100 पाऊले चालून नंतर टेम्प्रेचर घेणेत यावे अशी सूचना देणेत आली,नगरपरिषद क्षेत्रात आशा पदे मंजूर नाहीत तरी मलकापूर नगरपरिषदे प्रमाणे प्रस्ताव सादर करून मंजुरी नंतर पदे भरावीत याबाबत मुख्याधिकारी दगडे पाटील यांना सूचना देणेत आल्या,निसर्ग वादळाने झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेणेत आला,सर्व समावेशक पंचनामा नमुना तयार करणेत येऊन तो सादर करणेत यावा,असे सूचित करणेत आले,महसूल विभागाच्या अडीअडचणी ची चर्चा करणेत आली,पंचायत समितीच्या कृषी,ग्रामपंचायत,आरोग्य,पशुसंवर्धन, आपले सरकार सेवाकेंद्र,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान,घरकुल,प्रलंबित लेखा शक पूर्तता,पेन्शन केसेस,या सर्व विषयांचा आढावा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी घेऊन मार्गदर्शनपर सूचना दिल्या,तालुक्यातील विविध समस्या बाळासाहेब भिलारे व उपसभापती संजुबाबा गायकवाड यांनी मांडल्या,गट विकास अधिकारी यांनी सद्यस्थितीचा अहवाल सादर केला, जैवविविधता योजने बाबतीत पदाधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली याबाबत संस्थेला सर्वेक्षण करणेचे असून गाव व परिसरामध्ये जैविक विविधता, व विशेषतः या शोधून,माहिती घेऊन त्याच्या नोंदी लोकजैव विविधता नोंदवहीत नोंदवून नोंदवही ग्रामपंचायत पातळीवर कायमस्वरूपी जतन करावयाची आहे,यामुळे दुर्लभ व नित्यउपयोगी वनस्पतींची व इतर बाबींची माहिती पुढील पिढीला माहिती होऊ शकेल तरी याबाबत पदाधिकारी,आदेशीत संस्था, सरपंच व ग्रामसेवक यांची संयुक्तिक सभा घेऊन या परिपूर्ण माहिती गोळा करावी अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या,स्वागत विस्तार अधिकारी सुनील पार्टे यांनी केले तर आभार गट शिक्षण अधिकारी आनंद पळसे यांनी मानले