सध्या ‘कोरोना’ राक्षसाने साऱया जगात धुमाकूळ घातला आहे. त्याने आतापर्यंत असंख्य जीव गिळंकृत केले आहेत. पण या कोरोनाचे मूळ मात्र सापडले चीनमध्ये. तिथे आधी थैमान घालून मग तो जगभर पसरला. तो चीनमध्येच का पसरला? तर तिथल्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे. त्याही सामिष आहाराच्या अतिरेकामुळे. त्या सामिष आहारातदेखील विशिष्ट प्रकारचे मासे किंवा प्राणी, पक्षी असा कोणताच भेदभाव नाही. कोणताही प्राणी ते कच्चादेखील खातात. त्यानुसारच वटवाघळाचे मांस खाण्यातून हा कोरोना विषाणू पसरला. त्यावर जोपर्यंत औषध सापडत नाही, तोपर्यंत आपली प्रतिकार शक्ती वाढवणे, जास्तीत जास्त स्वच्छता राखणे, घराबाहेर न पडणे यातूनच त्याला आपण आळा घालू शकतो. खाण्याच्या सवयीला कोणताच धरबंध, शिस्त नसल्याने हा रोग जास्त फैलावला. भारतातही त्याने आपले हातपाय पसरले. चीनच्या खालोखाल आपल्या भारताचीही लोकसंख्या सर्वात मोठी आहे. पण केवळ जीवनशैलीचा थोडाफार प्रभाव, सरकारी यंत्रणा आणि सामान्य लोकांचे सहकार्य मिळून त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे आपल्या देशात कोरोनाची लागण लागूनही तो आटोक्मयात आहे तर अशा आरोग्याला मारक ठरणाऱया कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे एका श्लोकात सांगितले आहे. अनारोग्यं अनायुष्यं अस्वर्ग्यं च अतिभोजनम्। अपुण्यं लोकविद्विष्टं तस्मात् तत् परिवर्जयेत्।। अर्थ-आरोग्याला बाधक, आयुष्य कमी करणारे, स्वर्ग न देणारे, पुण्यकारक नसणारे, लोकांच्या द्वेषाला पात्र असे अति भोजन टाळावे. आणखी एका सुभाषितात म्हटले आहे की…. जिह्वे प्रमाणं जानीहि भोजने भाषणेए पि वा। अतिभुक्तरतीवोक्तिः सद्यःप्राणापहारिणि।। अर्थ- भोजनाच्या किंवा बोलण्याच्या बाबतीत जिभेची मर्यादा पाळावी. अति खाणे, अति बोलणे याबद्दलची आवड प्राण हरण करणारी ठरते. म्हणजेच साधे, सात्विक जेवण आरोग्याला हितकारक असते. आहारशास्त्र सांगते, The rich diet is the worst diet. पक्वान्न, गोड, तिखट असे तऱहे तऱहेचे प्रकार आरोग्याला विघातक असतात. म्हणूनच ‘प्रमाणात ते सारे काही असावे!’ असो. भारतीय संस्कृतीत अतिरेक कोणकोणत्या बाबतीत टाळावा हे अनेक ग्रंथातून सांगितले आहे. आपले वडिलधारे लोकही लहानपणी आपल्याला अशी शिकवण देत असतात. संतांनीही ती शिकवण दिली आहे. आहार, विहार, संचार इ. सर्व बाबतीत अतिरेक टाळणेच हिताचे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवले तर कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला एकजुटीने आपण परतवू शकू. पटतंय का?
आता थोडे व्यावहारिक संस्कृत- अहं(मी) गच्छामि(जातो/जाते)। सः गच्छति।तो जातो.सा गच्छति।ती जाते.त्वं गच्छसि।तू जातोस/जातेस.. अहं पठामि।मी वाचतो/वाचते.सः/सा पठति।तो/ती वाचतो/वाचते.त्वं पठसि।तू वाचतोस/वाचतेस.अहं खेलामि।मी खेळतो/खेळते.सः/सा खेलति। तो/ती खेळतो/खेळते. त्वं खेलसि। तू खेळतोस/खेळतेस.