फ्लॅटना ठोकले सील, जमीनीही ताब्यात
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत सक्रीय असणाऱया अथर्व फॉर यु इन्फ्रा ऍण्ड ऍग्रो कंपनीची रत्नागिरीमधील कोटय़वधींची मालमत्ता मुबई आर्थिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आली आह़े जिह्यात अथर्व इन्फ्रा कंपनीने रिएल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आल्यानंतर कंमनीचे फ्लॅट व जमीनी आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत़
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बलिराम धास यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अथर्व इन्फ्रा या कंपनीने रत्नागिरीत मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली होत़ी यामध्ये खास करून रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा समावेश आह़े जिह्याच्या विविध ठिकाणी जमीन व फ्लॅटची खरेदी या कंपनीकडून करण्यात आली होत़ी तपासामध्ये समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही संपत्ती ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आह़े
महाराष्ट्रासह अनेक राज्यात अर्थव या कंपनीने शाखा उघडल्या होत्य़ा फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात सुरूवात केल़ी आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये अथर्वं कंपनीच्या राज्यभरात 40 शाखा उघडण्यात आल्या होत्य़ा यामध्ये पनवेल, मुंबई, ठाणे, सांगली, रत्नागिरी येथील कार्यालयांचा समावेश आह़े या कंपनीने गोवा, राजस्थान, गुजरात कर्नाटक आदी राज्यामध्येही आपले हातपाय पसरले होत़े अथर्व इन्फ्रा कंपनी रत्नागिरीत गेल्या 2 वर्षाहून अधिक काळ कार्यरत होत़ी मात्र आपले हीत साध्य होताचा कंपनीकडून गाशा गुंडाळण्यात आला होता.
रत्नागिरीमधील गुंतवणूकदारांच्याही तक्रारी दाखल
अथर्व इन्फ्रा या कंपनीमध्ये रत्नागिरीतील गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली होत़ी या गुंतवणूकदारांच्याही तक्रारी आपल्यापर्यंत प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आह़े फसवणूक झालेल्या अन्य कुणाला तक्रार करावयाची असल्यास आर्थिक गुन्हे शाखेजवळ संपर्क साधावा